शेतकऱ्याला तात्काळ कर्जमुक्त करा विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत जिल्हाधिकारी , प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकऱ्याला तात्काळ कर्जमुक्त करा विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत जिल्हाधिकारी , प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर //संजीव भांबोरे भंडारा – आज दिनांक 26 मे 2025 ला विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 3.30 वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री यांना विविध मागण्यांच्या  निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करण्यात यावे, शेतकऱ्यांचे  विज बिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना बी बियाणे, खाते, औषधी, 50 टक्के सबसिडी वर देण्यात यावे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्यात यावा,, शेतकरी, शेतमजूर, श्रावण बाळ, विधवा, अपंग, निराधार यांच्या मानधनात वाढ करून 6000 हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार अण्णा 5% आरक्षण ऐवजी 15 टक्के करण्यात यावा, राज्यात व जिल्ह्यात सतत चार ते पाच वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक होत नाही .सतत नापिकीच्या सामना करावा लागतो. वारंवार अवकाळी पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांचे पीक नाईनाथ होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. वारंवार बँकेत काही ना काही गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेत असल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. तरीपण शासनाने आम्हाला निवडणुकीपूर्वी कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत कुठल्याच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्ह्यात, राज्यात, तालुकास्तरावर, शेतकऱ्याच्या सभा घेऊन, भेटी घेऊन, त्यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीतर्फे जमा करून शासनाला देण्यात येतील. करिता आपण निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन विदर्भवादी शेतकरी  संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना देण्यात आलेले आहे. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे संस्थापक सदानंद धारगावे ,उपाध्यक्ष उपाध्यक्ष नम्रता बागडे , रितिक मेश्राम , सीमा काळे, पांडुरंग नंदा गवळी ,महेंद्र मेश्राम, सुशीला गिरडकर अंबादास गिरडकर शितल गेडाम ,मनीषा भांडारकर, इत्यादी कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

COMMENTS