गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – २६ जानेवारी सविंधान अंमलबजावनी दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेत संविधान अंमलबजावणी करण्यासाठी निर्धार करू या!
बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने मिळविलेले आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवून राज्यकर्ते समाज बनायचे असेल कोणत्याही नेत्याच्या नाही तर बाबासाहेबांच्या पक्ष संघटना संविधानानुसार मजबूत करावेच लागेल. नेत्यांच्या एकाच विचारांच्या वेगवेगळ्या पक्ष संघटना ह्या तर मत आणि विचाराची विभागणी करून अख्खी आंबेडकरी चळवळच लाचार आणि कमजोर करण्यासाठी निघालेल्या आहेत. म्हणून २६ जानेवारी संविधान अंमलबजावणी दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या पक्ष संघटनेत संविधान अंमलबजावणी करण्यासाठी निर्धार करू या! असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जगदीश धवने, थुट्रा यांनी २६ जानेवारी २०२५ ला जोगाई पहाडावर आयोजित केलेल्या निसर्ग सहल बैठकीत बोलताना व्यक्त केले.

रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ ला ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर समोरच्या पहाडावर स्थळ- जोगाई पहाडावरील पुरातन विहार परिसरात निसर्ग सहल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मौजा थुट्रा त. कोरपना जि चंद्रपूर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जगदीश धवने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
बैठकीच्या कार्यक्रमांची सुरूवात सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. २६ जानेवारी हा भारतीय राज्यघटना अंमलबजावणी दिन असल्याने यांचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी उपस्थितासमोर भारतीय राज्यघटनेतील प्रास्ताविकेचे वाचन करून प्रतिज्ञाबद्द करण्यात आले.
सदर निसर्ग सहलीला बंगाली कॅम्प येथील चिंतामणी घुले, प्रभाकर खाडे आणि गौतम भसारकर यांनी या परिसरातील बुद्धविहार, ऐतिहासिक पाण्याचा तलाव, प्राचीन काळातील विहिरी आणि मानिकगड सिमेंट कम्पनीने प्राचीन काळापासून मुर्त्या नेलेल्या स्थळाची माहिती दिली.
बैठकीला उपस्थित असलेल्या अनुयायी कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी या संविधान अंमलबजावणी दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या पक्ष संघटना संविधानानुसार मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेच्या संविधानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा संकल्प करण्यात आला.
जोगाई पहाडावर झालेल्या बैठकीत बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे, सुरजभाऊ उपरे, जगदीश धवने, हंसराज ताकसांडे, वारलूजी नळे, गौतमभाऊ भसारकर, रमेश रंगारी, चंदू ताडे, नितेश रामटेके इत्यादींनी बाबासाहेबांच्या पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात आपापले विचार व्यक्त केले.
२६ जानेवारी संविधान अंमलबजावणी दिनाच्या निमित्ताने जोगाई पहाडावरील पुरातन विहार परिसरात निसर्ग सहल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस अशोककुमार उमरे, नितेश रामटेके, प्रभाकर खाडे, रविचंद्र वाघमारे, सुरजभाऊ उपरे, बोधकिर्त नरवाडे, चिंतामणी घुले, वारलू नळे, किशोर डोंगरे, वनमाला नळे, रमेश रंगारी, गौतम भसारकर, जगदिश धवने, किरण रंगारी, शिवाजी धुपे, हंसराज ताकसांडे, गोविंद इंगोले, चंदू देवाजी ताडे, नामदेव ताकसांडे, उज्वला ताडे, मनोज जगदीश मानकर, समिक्षा जगदीश मानकर, एकनाथ पाटील, अक्षय अनुराग तावू, अक्षय अरूण बावणे, इत्यादींनी निसर्ग सहलीचा आनंद घेत सहल बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोककुमार उमरे सुत्रसंचलन रमेश रंगारी आणि आभार प्रदर्शन हंसराज ताकसांडे यांनी मानले. बैठकीच्या कार्यक्रमाचा सरणतय घेऊन समारोप करण्यात आला.
COMMENTS