आंबेडकरी चळवळीतील ‘दादा’ माणूस गेला !

HomeNewsनागपुर डिवीजन

आंबेडकरी चळवळीतील ‘दादा’ माणूस गेला !

दादा उर्फ अजय इंगळे यांचे निधन

गौतम नगरी चौफेर चंद्रपूर – सन १९९० च्या दशकात जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीला जोरदार धार देणारे आणि चळवळीची पाळेमुळे गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पायाला भिंगरी बांधून फिरणाऱ्यापैकी असलेले दादा उर्फ अजय इंगळे (७३) यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने चळवळीतील ‘दादा’ माणूस हरविल्याच्या संवेदना कार्यकत्यांकडून व्यक्त होत आहे. दादांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.३० वाजता इरई नदीच्या शांतीधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी अॅड. जयश्री, दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. बाळासाहेच उर्फ प्रकाश आंबेडकर हे राजकारणात उतरल्यानंतर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून फिरणान्यांपैकी दादा आणि अॅड. जयश्री इंगळे हे दाम्पत्य होते. १९९० च्या दशकात राज्यातील अनेक भागात बौद्ध विरुद्ध हिंदू, असा मोठा सामाजिक संघर्ष सुरू होता. त्या काळात समाजाला ताकद देण्याचे काम इंगळे दाम्पत्याने केले. दादा आणि अॅड. जयत्री इंगळे हे दोघेही रात्रंदिवस फिरले. अॅड. जयश्री हम आपला वकिली व्यवसाय सांभाळून दादांसोबत सक्रीय राजकारणात उतरल्या, पुढे बरेच संदर्भ बदलले. कालांतराने बाळासाहेच आंबेडकरांसोबत मतभेद झाले आणि दादा इंगळे बाजूला गेले. आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या संवेदना व्यक्त केल्या जात आहे.
🙏

COMMENTS