सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा जिवती शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली<br>(आमदार, देवराव भोंगळे)

HomeNewsनागपुर डिवीजन

सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा जिवती शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली
(आमदार, देवराव भोंगळे)

गौतम नगरी चौफेर //चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे आभार व अभिनंदन करण्यासाठी काल दि. २३ मे रोजी जिवती शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिवती तालुक्यातील देशभक्त नागरिक, विविध प्रशासकीय अधिकारी, तरुण, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि हम सेना के साथ हैं अशा जयघोषात निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली.

पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे हे भ्याड कृत्य अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानला अशा भ्याड हल्ल्यांनी भारताला कधीही झुकवता येणार नाही. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर – ए- तोयबाशी संबंधित अनेक महत्त्वाचे दहशतवादी ठार झाले, ज्यात मौलाना युसूफ अझहर सारख्या प्रमुख दहशतवाद्याचाही खात्मा झाला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दहशतवादाच्या विरोधात घेतलेल्या संकल्पाशी जनता ठामपणे उभी असल्याचे या रॅलीने दाखवून दिले आहे असेही यावेळी आवर्जून म्हटले.

या रॅलीमुळे जिवती शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. या रॅलीत माझ्यासमवेत भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, नायब तहसीलदार शील, पोलीस उपनिरीक्षक श्री. वाडेवा, वन विभागाचे श्री. करकाडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंबे, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे श्री. दुधे, केशव गिरमजी, राजेश राठोड, गोविंद टोकरे, सुनील मडावी, गोपीनाथ चव्हाण, पुरुषोत्तम भोंगळे, बापुराव मडावी, अंबादास कंचकटले, दिगांबर आंबटवाड,आनंद कदम, पुंडलिक गिरमाजी, भिमराव पवार, संतोष जाधव, पुष्पा सोयम, चेतना राठोड, सुबोध चिकटे, बालाजी माने, सांबा शिंदे, संग्राम बाजगीर, बालाजी बिरजदार, साहेबराव राठोड, राज बेल्लाळे, रामेश्वर सबुचे, टिकाराम राठोड, गोवर्धन चव्हाण, संतोष राठोड, उखंडराव चव्हाण, मोकिंद राठोड, कमलाकर जाधव, संभाजी रायवाड, बाळू ठोंबरे, रवी जेवले, कपिल राठोड, विकास सोनकांबळे, शिवाजी बोइनवाड, राहुल राठोड आदिंसह जिवतीकरांची मोठी उपस्थिती होती.

COMMENTS

You cannot copy content of this page