चार दशकांनंतरही मागण्या प्रलंबित; प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप.
श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर” भंडारा/तुमसर :- तुमसर, ता. ६ : बावनथडी प्रकल्प पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शासनाच्या या सततच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता. सहा) बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने मुख्य उजव्या कालव्यामध्ये उतरून ‘पाणी रोको’ आंदोलन केले. महाराष्ट्र सर्कल परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बावनथडी नदीकाठावरील सुसूरडोह, कमकासूर आणि सितेकसा या गावांतील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याने अनेक कुटुंबांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. पुनर्वसित गावांमध्ये अद्याप रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय ताफ्याने सितेक सा येथे प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाच्या कोण त्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा पिके धोक्यात येण्याची भीती सध्या रब्बी (उन्हाळी) पिकांसाठी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी कालव्यात उडी मारून पाणी रोखून धरल्याने सिंचनावर अवलंबून असलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकप्रतिनिधीने फिरकूनही पाहिले नाही, ज्या मुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये अधिकच रोष पाहायला मिळाला.
बावनथडी संघर्ष समितीचे अध्यक्ष कि शो र उईके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, मनोज उईके, रोहित मरास्कोले, भीमरा व नैताम, सचिन उईके, बेनी धु वें, बालिक भलावी, भिकराम नैताम, सुलोचना उईके, शारजा उईके, रवींद्र लांजेवार, पदमा उईके, अलका भलावी यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त शासनाकडून सुविधा पुरवल्याचा केवळ दावा केला जातो. पण, वास्तवात आदिवासी बांधवांचे जीवन नरकयातना भोगत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील.
किशोर उईके, अध्यक्ष, संघर्ष समिती.
सह भागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता शासन या आक्रमक पवित्र्यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यास कोणताही अधिकारी आला नाही. त्यामुळे तणाव वाढलेला आहे.


COMMENTS