// (निलंबनाची मागणी)//
गौतम नगरी चौफेर //संतोष पटकोटवार गडचांदूर – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील सर्वात मोठी गडचांदूर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी ‘केमाजी धुमाळ’ यांच्या विरोधात गडचांदूर भाजप आक्रमक भूमिकेत असून मुख्याधिकारी ‘धुमाळ’ यांच्या निलंबनाची मागणी रेटून धरत रस्त्यावर उतरली आहे.अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी ‘केमाजी धुमाळ’ यांना निलंबित करावे,ही मागणी घेऊन गडचांदूर शहर भाजपाचे शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार व इतर प्रमुख पदाधिकार्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह 26 मे रोजी स्थानिक नगरपरिषदेवर मोर्चा काढला.नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी ‘आशिष चौहान’ यांना निवेदन देण्यात आले.
“नेमका प्रकरण काय?”
गडचांदूर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी ‘केमाजी धुमाळ’ हे डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत गडचांदूर नगरपरिषदेत प्रभारी म्हणून कार्यरत होते.पाच वर्षांचा कार्यकाल संपल्याने गेल्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी गडचांदूर नगरपरिषदेतील बॉडी बरखास्त झाली.आणि याठिकाणी प्रशासक बसले.त्यावेळी प्रभारी म्हणून ‘केमाजी धुमाळ’ हे येथील सर्वेसर्वा होते.याकाळात मुख्याधिकारी ‘धुमाळ’ यांनी मोठा पराक्रम गाजवला. नगरपरिषदेचे सर्व अधिकार यांच्याकडे असल्याने,यांनी आपल्या अधिकाराचा पुर्णपणे गैरवापर करून गडचांदूर-लखमापूर मुख्य मार्गावरील ईदगाह समोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या स.नं.104/1 प्लॉट क्रं.55 वर, तात्काळ रहिवासी वापरासाठी घर बांधकामाची परवानगी दिली.यामध्ये त्यांनी अटी-शर्तीचे उल्लंघन केले व जास्तीचे बांधकाम केले.पायऱ्याचे बांधकाम,हे अगदी लागून असलेल्या गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर राज्य महामार्गावर केले.असे भाजपकडून देण्यात आलेल्या निवेदनातून समोर आले आहे.
दरम्यान गडचांदूर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी ‘केमाजी धुमाळ’ यांच्या या कारनाम्यामुळे भाजप आक्रमक असून धुमाळ यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.गडचांदुरकरांच्या डोळ्यात धूळफेक करून गुप्तपणे दिलेल्या दारू दुकानाचा परवाना व घर बांधकामाची परवानगी डोळ्यासमोर ठेवून गडचांदूर शहर भाजपाचे शहराध्यक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांच्या नेतृत्वात 26 मे रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह स्थानिक नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत ते अनधिकृत बांधकाम तोडणार नाही तोपर्यंत येथून उठणार नाही? अशी भूमिका घेण्यात आली.दरम्यान नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी ‘आशिष चौहान’ यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल,यासाठी मला 24 तासांचा वेळ द्यावा,अशी विनंती केली.मुख्याधिकारी चौहान यांच्या विनंतीला सकारात्मक मान देऊन ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.आता यापुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो:-

COMMENTS